Posts

बदलले हे जीवन

खूप दिवस गेले ,खूप रात्रीही गेल्या नकळत मग मनात हलक्याशा त्या आठवणी आल्या  खरच ते दिवस खरच खूप वेगळे होते  त्या सुखाच्या दिवसात असेच दिवस जात होते  एकटे होते मन माझे एकट्या होत्या भाषा  आता मग या जीवनात त्या आठवणी आ अशा  दिवस सुरु व्हायचा हळूवार त्या किरणानी  कॉलेजच्या त्या दिवसात रंगायचे मी गप्पांनी  ज्यांच्या विचारांच्या मनात गुंताव असे खूप होते जवळचे... ढगात जसे ढग जातात तसेच माझ्या मनाचे झाले जवळच्या त्या लोकांत मग मग हळूहळू रमत गेले... दिवसामागून दिवस जात दिवस असे निघुन गेले  दिवसातल्या त्या सहवासात मग हे जीवनच बदलून गेले...

नाते हे

दिवसांच्या वाटेतून दिवस हे असेच निघुन गेले पण तरीही आपले हे मैत्रीचे नाते असेच हे जपून राहिले.... नकळत हे नाते हळूहळू हळूच सांगून गेले माझे हे स्वप्न मलाच हरवून गेले.... जगातल्या या दगदगीत अशी रविकिरणे असतात ही जगताना जगायला शिकवतात ही.... धुंद या आकाशात अशीच राहू दे मैत्री आपली एकमेकांच्या सुखदुःखात साथ देणारी अशी पापण्या मीटताना जो आनंद मिळतो तशी.... वचन दे मला अशीच निखळ आणि खोल असेल हे नाते जीवनाच्या शेवटपर्यंत साथ निभावेल हे असे....

तुझ्या आठवणीत...!

तुझ्या आठवणीतल्या जगात राहताना  खूप काही सांगायचे राहिले. आता आठवल्यावर मात्र  ते दिवस स्वप्नात समोर आले.  ओठावर शब्द उमठताना  बोलायचेच राहून गेले.  सांगता सांगता मग  ते शब्द मनातच लपून बसले खूप काही ऐकायचे राहिले  शब्दांसाठी मन तरसत राहिले  दिवसेदिवस  ते मग  असाच हळूच रडत राहिले  हात तुझा पकडताना  विचार करायचे राहून गेले  आयुष्य हे जगताना  पुढचे सगळे विसरून गेले 

जीवनाची ही गुंतागुंत

Image
दिवसामागून दिवस जातात आठवणी मात्र तशाच उरून जातात हळूहळू मग त्या दिवसेंदिवस आठवत राहतात. हसत हसत,रमत गमत स्वप्नामध्ये राहत जातात अशीच मग कधीतरी गालावर हसू देऊन जातात. खूप काही सांगायचं असत पण शब्द फुटायला तयार नसतात न बोलता मात्र ते खूप काही सांगून जातात . आजकालच्या या गर्दीत प्रत्येकजण हा एकटाच असतो स्वतःचे मन ऐकवण्यासाठी कुणीतरी शोधत असत. जीवनात हे अस नेहमीच घडत असत म्हणूनच हृदयावर हात ठेवून फक्त ALL IZZ WELL म्हणायचं असत. 

जीवनाबद्दल काही...!

जीवन कसं जगायचं हे कुणालाच कळत नसतं  कारण जीवन म्हणजे नक्की काय हे कुणालाच माहित नसतं  नशीब हे जीवनातून घडवायचं असतं  म्हणून जीवन हे नीट जगायचं असतं... जीवनात सारं काही समवालेलं असतं  कारण जीवनातूनच मनुष्य घडत असतो  जीवनातलं दुःख नशीबाला सांगून  सुखाचा मार्ग शोधायचा असतो... जीवन म्हणजे Life असतं  परंतु Life  is Money असतं  Money is Important असतं  अणि Important म्हणजेच जीवन असतं... जीवनात खूप करण्याजोगं असतं  कारण प्रयत्नानीच फळ मिळत असतं  करण्यासारखं असलं तरी करण्याइतकं सोपं नसतं कारण प्रयत्नाशिवाय जीवन घडत नसतं...

माझे मन,माझे विचार

Image
खूप वाटत की कोणीतरी असाव, मनाला जाणणारं ,मनाला ओळखणारं, मनाला समजून घेणारं आणि मनापासून आवडणारं ! गरज भासते कुणाचीतरी, रडताना आवडणाऱ्याची,दुःखात सुख देणाऱ्याची, आणि इच्छाना  वाव देणाऱ्याची ! खुप वाटत मनाला कुणाजवळ तरी मन  मोकळ  करता यावं, अश्रू पुसणारं कोणीतरी असावं,मन ज्याला मानतं असं कोणीतरी असावं ! मैत्रिणीतर भरपूर असतात पण, त्यातली एकच सखी असते,एकच जिव्हाळा असते ! मनालाही वाटतं की कोणीतरी मित्रही असावा, आपल्याला साथ देणारा,मनापासून आवडणारा, मन जाणणारा,मदत करणारा,जिव्हाळा असणारा, मैत्रीचा हात पुढे करणारा ! मावळलेल्या सुर्याचा दिवस तर उजाडलेच, माझ्या रुसलेल्या मनाला हसवणारा कुणीतरी येईलच !

समजावताना मग ..!

स्वप्नात हरवून जाताना , विसरून गेले स्वतःला ! रडत रडत हसताना , सांगून  गेले मनाला ! मग .. असच जीवन जगताना , समजावत गेले हृदयाला !